काँग्रेस नेत्यांच्या घरवापसीबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य!

काँग्रेस नेत्यांच्या घरवापसीबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य!

नाशिक – काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले काही नेते पुन्हा पक्षात घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या अनेकांना पक्षात परतायचे आहे. मात्र, यासंदर्भात निष्ठावंतांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पक्ष सोडून गेलेले नेते आता अत्यंत अस्वस्थ आहे. आपण चुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलो, आपण फसलो, अशी भावना त्यांच्या मनात आहे. मात्र, यापैकी काही नेते वारे फिरेल तसे फिरणारे आहेत. त्यामुळे या नेत्यांना पक्षात घेण्याची घाई करणार नाही. पक्षाला सोडून गेल्यानंतर अनेक जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय गयारामांना पुन्हा प्रवेश देणार नसल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS