ही तर परिवर्तनाची नांदी – अजित पवार

ही तर परिवर्तनाची नांदी – अजित पवार

अंबाजोगाई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालच्या तिस-या दिवशी हल्लाबोल यात्रेतील शेवटची सभा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये झाली. या सभेला मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी म्हणज्ये 2019 मध्ये परिवर्तनाची नांदी असल्याचा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या ध्येय धोरणांवर जोरदार टीका केली. शेतक-यांना सरकारने वा-यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच हे सरकार घटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत, सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. तर धनंजय मुंडे यांनीही सरकावर टीकेची झोड उठवली. ही गर्दी म्हणज्ये जनता का मुड बदल रहा है असं धनंजय मुंडे म्हणाले.

मागच्या निवडणुकीत भाजपची लाट आली आणि त्यांचे सरकार बनले. आम्ही मागचे तीन दिवस उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात तरूणाईच्या उत्साहाने उसळलेल्या लाटा पाहत आहोत. या तरूणाईच्या लाटाच २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरकार आणतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

COMMENTS