आमदार बच्चू कडूंवर हत्येचा कट रचल्याचा भाजप नगरसेवकाचा आरोप !

आमदार बच्चू कडूंवर हत्येचा कट रचल्याचा भाजप नगरसेवकाचा आरोप !

अमरावती – अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी हा आरोप केला असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान बच्चू कडू यांनी गोपाल तिरमारेंनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्यावर राजकीय वैमनस्यातून हा आरोप केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच गोपाल तिरमारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सुडबुद्धीने माझ्याविरोधात तक्रार दिली असल्याचा त्यांनी खुलासा केला आहे.

COMMENTS