“दलित चळवळ बदनाम करण्यासाठी भाजपचे षडयंत्र !”

“दलित चळवळ बदनाम करण्यासाठी भाजपचे षडयंत्र !”

सांगली – भिडे आणि एकबोटे यांच्यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच दलित चळवळ आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी भाजपवाल्यांनी षडयंत्र रचलं असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान शिवसेना आणि भाजपाची युती होईल का नाही माहीत नाही पण ही फक्त सौदेबाजी असून अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट म्हणजे हा फक्त सौदेबाजीचा प्रकार असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली आहे. भाजपाचा पराभव करायचा असेल तर समविचारी पक्ष एकत्र येणे गरजेचे असून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत आम्ही सकारात्मक आहोत, मात्र आघाडीबाबतचा निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच घेणार असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS