त्यासाठी स्थानिक पक्षांसोबत काँग्रेस आघाडी करणार – पृथ्वीराज चव्हाण

त्यासाठी स्थानिक पक्षांसोबत काँग्रेस आघाडी करणार – पृथ्वीराज चव्हाण

नाशिक- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला यश मिळाले आहे. तेथील जनतेने भाजपाला आता नाकारलेले आहे, हे या तिन्ही राज्याच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी उरलेल्या सर्व राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत आघाडी करणार आहे. नागरिक मोदी सरकारला कंटाळले आहे, म्हणून जनताच आता भाजपाला घरी बसवणार असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

दरम्यान पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर काँग्रेसची ताकद वाढली आहे. असे असले तरी सध्या लोकशाहीला धोक्‍यात आणणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पक्षांसोबत काँग्रेस आघाडी करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. नाशिक शहर काँग्रसे कमिटीचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या कन्येच्या विवाहास पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी नाशिकमधील लंडन पॅलेस येथे त्यांनी वधू-वरास शुभेच्छा व भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

 

COMMENTS