लोकसभा निवडणुकीत पत्ता कट, किरीट सोमय्या यांचं पुनर्वसन होणार ?

लोकसभा निवडणुकीत पत्ता कट, किरीट सोमय्या यांचं पुनर्वसन होणार ?

मुंबई – भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपनं पत्ता कट केला आहे. ईशान्य मुंबईतून सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु
किरीट सोमय्या यांचं पुनर्वसन होणार असून त्यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्य केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. त्यामुळे सोमय्या यांचं तिकीट कापण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच तिकीट कापल्यामुळे सोमय्या हे पक्षावर नाराज झाले आहेत. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS