“लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील ।”

“लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील ।”

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. सर्वच पक्षांकडून आमचाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील बहूमताचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातच भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.

मी प्रचारासाठी देशभरात फिरलेल्या ठिकाणचा जनतेचा प्रतिसाद पाहता पाचव्या आणि सहाव्या टप्प्यानंतरच भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे, हे मी खात्रीने सांगतो. सातव्या टप्प्याच्या मतदानानंतर हा आकडा ३०० च्या वर जाईल. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एनडीएचे सरकार स्थापन करतील, असा दावा शाहा यांनी केला आहे.

दरम्यान केंद्रात बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांची गरज असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती २८२ जागा जिंकून स्वबळावर सरकार स्थापन केले होते. मात्र, यंदा भाजपला अशी कामगिरी जमणार नाही, असा अंदाज अनेक राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु या निवडणुकीत एनडीए ३०० च्या वर जाईल असा दावा शाह यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा हा दीवा कितपत खरा ठरणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS