भाजपला धक्का, विद्यमान खासदाराचे चिरंजीव अपक्ष लढणार ?

भाजपला धक्का, विद्यमान खासदाराचे चिरंजीव अपक्ष लढणार ?

अहमदनगर  आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण नगरमधील भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपने नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं आहे. तिकीट कापल्यामुळे दिलीप गांधी नाराज असल्यामुळे त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान दिलीप गांधी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट न देता भाजपने नुकतेच काँग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिलीप गांधी नाराज आहेत.याच पार्श्वभूमीवर दिलीप गांधी यांचा उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्यात ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS