भाजपच्या महापौरांचं अज्ञान, “15 ऑगस्ट 1997 ला भारत स्वातंत्र्य झाला !”

भाजपच्या महापौरांचं अज्ञान, “15 ऑगस्ट 1997 ला भारत स्वातंत्र्य झाला !”

मुंबई – भाजपच्या महापौरांचं अज्ञान उघड झालं असून त्यांनी आपला भारत देश 15 ऑगस्ट 1997 ला स्वातंत्र्य झाला असल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या मिरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांनी आपले अज्ञान उघड केले आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाषणादरम्या बोलत असताना डिंपल मेहता यांनी 1997 ला भारत स्वातंत्र्य झाला असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान १५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन असल्याने देशभरात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मिरा भाईंदर महापालिकेतही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना डिंपल मेहता यांनी १५ ऑगस्ट १९९७ ला भारत स्वतंत्र झाल्याचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे त्यांची चूक दाखवून देण्याऐवजी आमदार नरेंद्र मेहता यांनी टाळ्या वाजवल्या असल्याचं पहावयास मिळाले.

 

COMMENTS