सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपनं राज्यपालांना कळवला ‘हा’ निर्णय!

सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपनं राज्यपालांना कळवला ‘हा’ निर्णय!

मुंबई – राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. भाजपनं राज्यपालांना सत्तास्थापनेविषयीचा आपला निर्णय कळवला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या निर्णयाची माहिती दिली असून विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत या महायुतीला जनतेने भरगोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश देखील महायुतीला दिला. मात्र, शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही राज्यपालांना सत्तास्थापनेस नकार दिला असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करायचं असेल, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा करणार का आणि त्यानंतर शिवसेना सत्तास्थापन करणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS