बोफोर्स प्रकरणावरुन गांधी परिवाराबद्दल काय म्हणाले शरद पवार ?

बोफोर्स प्रकरणावरुन गांधी परिवाराबद्दल काय म्हणाले शरद पवार ?

चंद्रपूर – राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या फाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आताचे राज्यकर्ते करीत आहेत. आता यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली. त्यामुळंच जुनी प्रकरण उकरून गांधी कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सध्याचं सरकार सत्तेचा गैरवापर करत असून आकसाचे राजकारण सुरू असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे. इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकल्यानंतर 6 महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिलं. हा इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत असंही पवार म्हणाले. बोफोर्स प्रकरणावरुन शरद पवारांनी सध्याच्या सरकावर तोफ डागत गांधी परिवाराचा जोरदार पाठराखण केली आहे.

COMMENTS