हिंसाचारामागे बसपा आमदाराचा हात, पोलिसांचा दावा !

हिंसाचारामागे बसपा आमदाराचा हात, पोलिसांचा दावा !

नवी दिल्ली –  भारत बंद दरम्यान घडून आलेल्या हिंसक वळणाला बसपाचा आमदारच जबाबदार असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. योगेश वर्मा असं या आमदाराचं नाव असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ९ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ लोक जखमी झाले असल्याची माहिती आहे. याबाबत मेरठचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मंजिल सैनी यांनी या हिंसाचाराचा कट रचण्यात आमदार योगेश वर्मा यांचा हात असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना खुली परवानगी दिली होती. या हिंसाचारात सहभागी २०० लोकांनाही यावेळी ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये खटला दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तसेच यामध्ये योगेश शर्मा यांचाही समावेश असून त्यांच्यावर हत्या केल्यासह हिंसाचार पसरवल्याचा खटला दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS