तिहेरी तलाक अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !

तिहेरी तलाक अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !

नवी दिल्ली – तिहेरी तलाक अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवणार आहे. तिहेरी तलाक विरोधातील या विधेयकात केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात तीन सुधारणा केल्या आहेत. नव्या सुधारणांनुसार प्रस्तावित कायदा अजामिनपात्र आहे. पण खटला चालू होण्यापूर्वी आरोपी जामिनासाठी न्यायादंडाधिकाऱ्याकडे दाद मागू शकतो. अजामिपात्र गुन्हा असल्यामुळे पोलीस परस्पर आरोपीची सुटका करु शकत नाहीत. तसेच दुसऱ्या सुधारणेनुसार पतीने तीनवेळा तलाक शब्द उच्चारुन तलाक दिल्यास पीडित पत्नी किंवा तिच्या जवळचे नातेवाईक आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल करु शकतात.

दरम्यान तिहेरी तलाकला गुन्ह्याच्या कक्षेत आणणारे विधेयक लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले. परंतु राज्यसभेत हे विधेयक अडकून पडले आहे. विरोधी पक्षांना या विधेयकातील काही मुद्यांवर आक्षेप घेतला आहे. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक संबंधी निकाल देताना तिहेरी तलाकला घटनाबाह्य, बेकायद ठरवले होते तसेच केंद्र सरकारला यासंबंधी कायदा करण्यासही सांगितले होते.

 

COMMENTS