भुजबळांच्या बाजूला अजून दोन-तीन कोठड्या रिकाम्या, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा !

भुजबळांच्या बाजूला अजून दोन-तीन कोठड्या रिकाम्या, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा !

मुंबई  भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातून आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता सभास्थळी मंचावर दाखल झाले आहेत.

दरम्यान यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली असून हल्लाबोल करणाऱ्यांनी इतके वर्ष स्वतःचा गल्ला भरून घेतला आहे. त्यामुळे भुजबळांच्या बाजूला अजून दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सध्या सरकारविरोधात  पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. अजित पवार यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या या मेळाव्यात अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांच्या बाजुला अजून दोन कोठड्या रिकाम्या असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. पाटील यांनी दिलेल्या या इशा-यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 

 

COMMENTS