मी हेच सांगायला आणि गुलाल उधळायला बारामतीत जाणार – चंद्रकांत पाटील

मी हेच सांगायला आणि गुलाल उधळायला बारामतीत जाणार – चंद्रकांत पाटील

सांगली – राज्यात भीषण दुष्काळ आहे. आम्ही त्यावर उपाययोजना करतो आहोत. पण जाणत्या राजाला ते दिसत नाही. मी हेच सांगायला आणि गुलाल उधळायला येत्या 23 तारखेला बारामतीत जाणार असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दुष्काळी भागात अतिशय चांगली व्यवस्था ठेवण्यात आली असतानाही शरद पवारांसारखे नेते सरकारवर टीका करत आहेत. महाराष्ट्रात छावण्या नाहीत, टँकर नाहीत, असं म्हणत आहेत. त्यामुळे येत्या 23 मे रोजी त्यांना सांगण्यासाठी आणि गुलाल उधळण्यासाठी बारामतीत जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान छावणी चालक अनुदान वाढवून मागत आहेत. या मागणीचाही सरकार सकारात्मक विचार करत आहे.  शेतकऱ्यांनी दुष्काळाबाबत घाबरु नये. आमचे सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ते मंगळवेढ्यात बोलत होते.

COMMENTS