‘अब की बार लांबूनच नमस्कार’, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल !

‘अब की बार लांबूनच नमस्कार’, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई – ‘अब की बार लांबूनच नमस्कार’ म्हणण्याची वेळ या सरकारने आणली आहे. राज्य टोलमुक्त करू, राज्य खड्डेमुक्त करू असे आश्वासन सरकारने दिले होते. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नसल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. हल्लाबोल यात्रेतील सभेत बोलत असताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन हे सरकार आले मात्र महिलांना सुरक्षा देत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज त्यांनी यांचा कडेलोट केला असता असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS