…तसं केल्यास आरक्षण एक दिवसही टिकणार नाही – मुख्यमंत्री

…तसं केल्यास आरक्षण एक दिवसही टिकणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई –  मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असून सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. परंतु आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर बाबी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. काही लोक म्हणतात अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, पण तसं केल्यास ते आरक्षण एक दिवसही टिकणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या लोकांना हे कळतं ते आज बोलू शकत नाहीत कारण ते दडपणात आहेत, परंतु ज्यांना हे कळत नाही त्यांना निश्चित भविष्यात हे कळेल की आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे असं सूचक वक्तव्यही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच निकाली काढणार असून मराठा समाजाला जर कोणी आरक्षण देईल तर ते हेच सरकार असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी हवं तर आज अध्यादेश काढू शकतो, परंतु ते न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार असून मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

COMMENTS