प्रज्ञा ठाकूर यांनी करकरेंबाबत असं बोलायला नको होतं – फडणवीस

प्रज्ञा ठाकूर यांनी करकरेंबाबत असं बोलायला नको होतं – फडणवीस

नवी दिल्ली –  साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी करकरेंबाबत असं वक्तव्य करायला नको होतं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. हेमंत करकरे हे मायभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाले आहेत. तसेच करकरे यांनी कधीही हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केला नाही, तर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रथम या शब्दाचा उपयोग केला असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते इंदूर येथे बोलत होते.

दरम्यान  माझ्या शापानेच हेमंक करकरे यांचा मृत्यू झाला असल्याचं वक्तव्य भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केलं होतं. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी करकरेंबाबत असं वक्तव्य करायला नको होतं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दिग्विजय सिंह यांच्यानंतर सुशिलकुमार शिंदे आणि शरद पवार यांनीही हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS