नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही – मुख्यमंत्री

नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही – मुख्यमंत्री

मुंबई – खासदार नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही. ते आमचेच खासदार आहेत. असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असे म्हणत असले तर तो निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुनच घेण्यात येईल असही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झालं आहे. पिढी बदलली आहे. लोकांना तोडण्या-फोडण्याचं राजकारण आता आवडत नाही. नव्या पिढीला अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत.तुम्ही साखर सम्राटांना भाजपामध्ये येण्यासाठी नोटीसचे भय दाखवता असा आरोप शरद पवार करतात. त्यावर फडणवीस यांनी शरद पवार असे राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना तसे वाटते असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते इंडिया टुडेच्या कॉनक्लेवमध्ये बोलत होते.

COMMENTS