सांगली, जळगाव विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया !

सांगली, जळगाव विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया !

मुंबई – सांगली महापालिकेत भाजपनं मिळवलेल्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढली तरी जनतेने आम्हाला कौल दिला आहे. यामधून स्पष्ट होतं की जनतेच्या मनात काय आहे. जळगाव-सांगलीतील जनतेचे आभार मानतो, भाजापावर विश्वास दाखवला याबद्दल भाजपावर जनतेचा विश्वास असल्याचं दिसून येत आहे. हे या निकालावरून सिद्ध झालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच जळगावमध्ये गिरीश महाजन, नाथाभाऊ खडसे आणि सांगली महापालिकेत सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील या सर्वांनी मेहनत घेतली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील मराठा आंदोलनावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मराठा समाजाच्या मागण्या न्यायपूर्वक आहेत. या मागण्या गेल्या कित्येक वर्षाआधीच्या आहेत. जनतेला माहिती आहे की आम्हीच त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकतो असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS