मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली  मंत्रिमंडळाची बैठक, घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक, घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण’ मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीत केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या बैठकीत केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत ‘मातोश्री’हून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी गेले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर ‘कोरोना’पासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता.
तसेच सरकारची मर्सिडीज टाळून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची गाडी वापरली. दोन आठवड्यापूर्वीही उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मागच्या सीटवर बसले होते, यावेळी मात्र मुख्यमंत्री गाडीने एकटेच गेले होते.

COMMENTS