काँग्रेसमध्ये फेरबदल, महाराष्ट्रातील प्रभारी बदलले !

काँग्रेसमध्ये फेरबदल, महाराष्ट्रातील प्रभारी बदलले !

मुंबई – राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले जात असल्याचं पहावयास मिळत आहे. देशभरातील अनेक नेत्यांना राहुल गांधी यांनी चांगली संधी दिली असून तरुण चेह-यांना विशेष प्राधान्य दिलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. आता महाराष्ट्रातील प्रभारीपद बदलण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रभारी असलेले मोहनप्रकाश यांची प्रभारीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मोहनप्रकाश यांच्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे हे राज्याचे नवे प्रभारी झाले आहेत.

दरम्यान मोहनप्रकाश यांच्याबरोबर असलेल्या सरचिटणीसांचीही उचलबांगडी करण्यात आली असल्याची माहिती आहे. पालघर निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाचा ठपका ठेवत मोहनप्रकाश आणि त्यांच्याबरोबरच्या सरचिटणीसांची उचलबांगडी करण्याती आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पालघरची निवडणूक लढवण्याचा मोहनप्रकाश यांचा हट्ट होता. त्यामुळेही पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज होते अशी माहिती आहे. त्यामुळे पक्षात फेरबदल केले गेले असल्याचं कळतंय.

COMMENTS