मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक, राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर !

मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक, राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर !

मुंबई – राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित असून वैयक्तिक कारणामुळे राधाकृष्ण विखे पाटील बैठकीला गैरहजर आहेत.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. या परस्थितीवरुन सरकारला धारेवर धरण्यासाठी तसेच दुष्काळावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य काँग्रेसनं बैठक बोलावली आहे. तसेच या बैठकीत लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा देखील घेण्यात येणार आहे. परंतु या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विखे पाटील चर्चेत आले आहेत.

PAGES

1 2

COMMENTS