काँग्रेसला मोठा धक्का, 12 आमदारांनी दिला राजीनामा !

काँग्रेसला मोठा धक्का, 12 आमदारांनी दिला राजीनामा !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमधील काँग्रेसच्या १२ आमदारांनी विविध पदांचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पक्षाकडे राजीनामे सोपवत आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत असल्याचे सांगितले आहे. मणिपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे पक्षाच्या १२ आमदारांनी राजीनामे सोपवले आहेत. आम्हाला काँग्रेस पक्षाची काहीच अडचण नाही. आम्ही केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत आहोत. आमच्या राजीनाम्याचे केवळ हेच कारण असल्याचं या आमदारांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझ्याकडे काही सहका-यांनी राजीनामे सोपवले आहेत, मात्र मी अजुनही कोणत्याही पत्रकावर स्वाक्षरी केलेली नाही. राहुलजींनी पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने आपला राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी स्तरावर देखील आम्हाला याचे पालन करावे लागेल. काँग्रेस कार्यकारणी समितीच या १२ आमदारांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेईल. असं मणिपूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष गैखंगम यांनी म्हटले आहे.

COMMENTS