‘महाआघाडी’तील जागावाटपाचं सूत्र निश्चित, प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोडणार ‘एवढ्या’ जागा ?

‘महाआघाडी’तील जागावाटपाचं सूत्र निश्चित, प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोडणार ‘एवढ्या’ जागा ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाआघाडी’तील जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सोबत घेण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला चार जागा, राजू शेट्टी यांच्या संघटनेला दोन जागा आणि माकपला एक जागा सोडण्यावर सर्व नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महाआघाडीच्या जागावाटपावर विस्ताराने चर्चा करण्यात आली. या बैठकीला विखेंसह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.

COMMENTS