लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील महाआघाडीसाठी काँग्रेसचं पहिलं पाऊल !

लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील महाआघाडीसाठी काँग्रेसचं पहिलं पाऊल !

मुंबई – राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसने पहिलं पाऊल टाकलं असल्याचं दिसत आहे. समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे यासंदर्भात अहवाल देण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, बहुजन विकास आघाडी, सीपीएम, रिपाई (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज काँग्रेसची आगामी निवडणुकीबाबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आघाडीबाबत निर्णय घेण्यात आला असून आगामी निवडणुकीत एक जागा एक उमेदवार हे सूत्र ठेवण्यात येणार असून ज्या जागेवर जो उमेदवार निवडून येईल, तो गुणवत्तेचा निकष धरुन मतविभाजन टाळण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे.

दरम्यान आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे …

कोणत्याही जागी उभा केलेला उमेदवार निवडून यावा, मतविभाजन टाळावं यासाठी एक मतदार संघ, एक उमेदवार असं सूत्र असावं

उमेदवार निवडून येऊ शकतो हा एकच गुणवतेचा निकष धरण्यात यावा

लोकसभा जागा आणि विधानसभा समतोल साधण्याचा प्रयत्न करावा

 पालघरमध्ये 70% मतदान भाजपविरोधी

कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस, बसपा एकत्र लढले असते तर 180 जागा काँग्रेसने जिंकल्या असत्या.

हे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टाळावं

लोकसभा 48 उमेदवार आणि विधानसभेसाठी 288 उमेदवार

कोणत्या जागेवर काँग्रेस आणि कोणत्या जागेवर राष्ट्रवादी प्रबळ याबाबत चर्चा

 

COMMENTS