“भाजपसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मतं मागितल्याची खंत !”

“भाजपसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मतं मागितल्याची खंत !”

धुळे   भाजप सरकारसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मतं मागितल्याची मोठी खंत वाटत असल्याचं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. भाजप सरकार आणून भाकरी करपू नये म्हणून परतवली मात्र या सरकारने तवाच करपून लावल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. सरकारी अनास्थेचे बळी ठरलेले धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण या गावी शेतकरी सन्मान यात्रेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी त्यांनी धर्मा पाटील प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पक्षासोबत आघाडी केली होती. या निवडणुकीत खा. राजू शेट्टी यांनी भाजपसाठी मते मागितली होती. या निवडणुकीत सरकारला जनतेने कौल दिला आणि भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र, शेतीचे प्रश्न आणि भाजप सरकारची धोरणे या मुद्द्यांवर मतभेद झाल्याने खा. शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

 

COMMENTS