कर्जमाफी मिळालेला शेतकरी दाखवा, 501 रुपयांचे बक्षिस मिळवा !

कर्जमाफी मिळालेला शेतकरी दाखवा, 501 रुपयांचे बक्षिस मिळवा !

चंद्रपूर – शेतक-यांची दिवाळी गोड करू असं आश्वासन दिलेल्या राज्य सरकारला ते पाळता आलेलं नाही, एवढच नाही तर अजूनही अनेक ठिकाणी यादांचा घोळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र राज्यातील 15 लाख 42 हजार शेतक-यांना कर्जमाफीचे पैसे दिल्याचा दावा केला आहे. त्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी तर याबबत एक गमतीदार योजनाच जाहीर केली आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकरी दाखवा आणि 501 रुपयांचं बक्षिस मिळवा अशी योजनाच काँग्रेसर्फे जाहीर करण्यात आली आहे. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक सुरू असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे. यावरुन येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारु असंही वडेट्टीवार म्हणाले.

COMMENTS