…तर नारायण राणेंनी निवडणूक लढवू नये, दीपक केसरकर यांचा सल्ला!

…तर नारायण राणेंनी निवडणूक लढवू नये, दीपक केसरकर यांचा सल्ला!

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे हे विधानसभेची निवडणूक कुडाळ-मालवण या मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. राणेंनी हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा निवडणूक लढवू नये, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. नारायण राणे हे दोनवेळा हरले आहेत. गेल्या विधानसभेला कुडाळमधून हरले, तर पोटनिवडणुकीत वांद्रे मतदारसंघातही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांना हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा राणेंनी निवडणूक लढवू नये असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तसेच वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी हरवलं होतं. त्यामुळे हरण्याची हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा निवडणूक लढवू नये, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच राणे हे मोठे नेते आहेत. त्यांनी सर्वोच्च पदे भूषविली आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. परंतु शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक हे तरूण तडफदार आहेत, त्यांचा चांगला संपर्क असल्याचंही केसरकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS