देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात – देवेंद्र फडणवीस

देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात – देवेंद्र फडणवीस

मुंबई – कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात
होत असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.महाराष्ट्रात कोरोना वाढतोय. आज आपण बघितलं तर देशात एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 41 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांचे फेरफार केला जात आहेत. काल एका दिवसात 8 हजार रुग्ण डिस्चार्ज झाल्याचं दाखवलं आणि डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठी या वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान यावेळी फडणवीस यांनी
राज्य सरकारच्या वरळी पॅटर्नच्या दाव्यावर सडकून टीका केली आहे.
आयसीएमआरने आणि केंद्रीय समितीने जे सांगितलं होतं ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते कोठेही वरळी पॅटर्न म्हणालेच नाहीत. मात्र, वरळी पॅटर्न देशभरात स्वीकारणार अशा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या.

खरंतर वरळी पॅटर्नमध्ये लक्षणं नसलेल्या संशयितांच्या चाचणी पूर्णपणे बंद करुन टाकण्यात आल्या होत्या. वरळीच्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्या सुरु होत्या. त्या प्रयोगशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे एकुणच लपवाछपवी करुन आपल्याला कोरोनाचा संसर्ग थांबवता येणार नसल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS