ही लपवा-छपवी आणि भीती का?,  महाराष्ट्राला याचं उत्तर हवय, फडणवीसांचा सरकारवर हल्ला!

ही लपवा-छपवी आणि भीती का?, महाराष्ट्राला याचं उत्तर हवय, फडणवीसांचा सरकारवर हल्ला!

मुंबई – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार उदयास आले आहे. या सरकारची स्थापना होताच विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारवर आता जोरदार टीका करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली आहे. कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? करता असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?
महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.

तर दुसय्रा ट्वीटमध्ये या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का?
नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? केली जात आहे. असा सवाल त्यांनी केला आहे.

COMMENTS