शिवसेनेशिवायही निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य – मुख्यमंत्री

शिवसेनेशिवायही निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य – मुख्यमंत्री

मुंबई   शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करु मात्र भविष्यात शिवसेना भाजपसोबत असो, वा नसो पदाधिकाऱ्यांनो तयारीला लागा अशी सूचना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिका-यांना दिली आहे. तसेच शिवसेनेशिवायही निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य असल्याचं पालघर लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिलं असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या भाजप प्रदेश पदाधिका-यांची बैठकीत ते बोलत होते.

दुसरीकडे समविचारी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आमचे प्रयत्न असून मात्र एका पक्षाने युती होत नाही. शिवसेनेने एकत्र यायला हवं असं वक्तव्य यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. राज्यात दोन लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. मात्र पालघरमध्ये आम्ही सर्व विरोधक एकत्र असताना निवडून आलो. देशात भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यावं यासाठी हालचाली सुरु असल्याचंही यावेळी रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS