माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, धनंजय मुंडेंचा टोला!

माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, धनंजय मुंडेंचा टोला!

सोलापूर – माढ्यातले काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोहिते पाटील यांना लगावला आहे. काय कमी केलं होतं पवार साहेबांनी यांच्यासाठी? इथली जनता राष्ट्रवादीवर, पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. येत्या 23 मे रोजी माढ्यातली जनता सर्व हिशोब करणार असल्याचेही यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावळी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली आहे. भाजपने 2014 साली पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, सपनों का सौदागर दिला होता. या सौदागरने सर्वांना फसवले. भाजपने शेतकऱ्यांना फसवले, कष्टकऱ्यांना फसवले, दलितांना फसवले, धनगरांना फसवले असल्याचंही यावेळी मुंडेंनी म्हटलं आहे.

तसेच भाजपला मतदान करा, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. आज पाच वर्षे झाली तरी तो सोनेरी दिवस उजाडला नाही. त्यांनी आरक्षण तर दिलेच नाही उलट धनगर समाजाच्या आरक्षणाची फाईलच हरवल्याची कबुली कोर्टात दिली. फसवणीस सरकारचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे आवाहनही यावेळी मुंडे यांनी केलं आहे.

 

COMMENTS