सरकारमधील मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे – धनंजय मुंडे

सरकारमधील मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे – धनंजय मुंडे

मुंबई – पक्षातील एक आमदार मुली पळवून नेण्याची जाहीररित्या भाषा करतो. त्या आमदाराने माफी मागितली की विषय संपला असं म्हटलं जातं. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच हे या महाराष्ट्राचं दुर्दैवं असून हे सरकार राम कदमांची पाठराखण करत आहे. खरं तर पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपाने राम कदम यांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी होती असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राम कदम यांनी माफी मागितली त्यामुळे हा विषय संपला असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर बोलत असताना धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

COMMENTS