जमिनी परत मागणा-या शेतक-याला धनंजय मुंडेंचं उत्तर !

जमिनी परत मागणा-या शेतक-याला धनंजय मुंडेंचं उत्तर !

बीड  जमिनी परत मागणा-या शेतक-याच्या पत्राला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. जगमित्र साखर कारखान्याच्या जमिनीवरुन शेतकरी मुंजा गित्ते यांनी धनंजय मुंडे यांना पत्र लिहिलं होतं. त्याला अखेर मुंडे यांनी उत्तर दिलं असून महामार्ग आणि शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला, म्हणूनच मुंजा गित्ते प्रकरणावरुन आपल्या बदनामीचे षडयंत्र सुरु असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

परळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही असं जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी धनंजय मुंडे यांना लिहिलं होतं. त्यानंतर आज मुंजा गित्ते प्रकरणावर धनंजय मुंडेंनी बीडमध्ये स्पष्टीकरण दिलं असून “ज्या मुंजा गित्तेंची जमीन जगमित्र कारखान्यासाठी घेण्यात आली होती, त्या जमिनीचा संपूर्ण मोबदला त्यांना दिला आहे. त्याचे सर्व रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध आहे. हवे असेल तर त्यांना आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांनाही त्यांची जमीन परत देण्याची तयारी आहे असंही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही गेल्या चार वर्षांपासून मुंजा गित्ते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे काही नेते आपली बदनामी करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

COMMENTS