आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज आक्रमक, भाजपच्या वचननाम्याची केली होळी !

आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज आक्रमक, भाजपच्या वचननाम्याची केली होळी !

मुंबई – आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजानं आक्रमक भूमिका घेतली असून राज्यात ठिकठिकाणी आज आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनादरम्यान भाजपच्या वचननाम्याची धनगर समाज बांधवांनी होळी केली आहे. औरंगाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना-भाजपच्या लोकसभा निवडणुक 2014 मधील  ‘वचननाम्याची’  होळी धनगर समाजातील नेत्यांनी केली आहे.

धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब समाज बांधवांचा संयमाचा अंत बघणारा आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीने धनगर आरक्षणाबाबत लिखित आश्वासन दिले; त्यानंतरही वारंवार आरक्षण देऊ असेच सांगितले.

दरम्यान धनगर आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप धनगर समाजानं केला आहे. तसेच हे आता खपवून घेतले जाणार नाही असा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे. तसेच पुढील काळात या सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

COMMENTS