भाजपला मते न देण्याची धनगर बांधवांनी घेतली शपथ !

भाजपला मते न देण्याची धनगर बांधवांनी घेतली शपथ !

नाशिक – आमची मते घेऊन सरकारने विश्वासघात केला. तसेच मराठा आरक्षण देताना धनगर समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकरांनी केला आहे. मंत्रालय जाळण्याची वाट बघू नका, असा इशाराही उत्तमराव जानकर यांनी दिला आहे.  सरकारने गोवारी समाजाशी गद्दारी केली.

आता धनगर समाज हे होऊ देणार नाही. आज तीन, चार सभा घेऊन आरक्षण मिळविणारच असंही जानकर यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार धनगर समाजाचे प्रमाणपत्र देत असताना राज्य सरकार देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  नाशिकमध्ये आयोजित केलेल्या धनगर मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान लोकसभेत 7 आणि विधानसभेत 35 आमदार पाठविण्यासाठी हा लढा सुरु असून धनगर समाज सर्वात मोठा आहे. उपेक्षितांना समजू नये म्हणून जातनिहाय गणना नाही. तसेच एसटीत आरक्षण पाहिजेच असल्याचं माजी आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करू नका, विरोबाची शपथ आहे.जोवर आरक्षण मिळणार नाही तोवर मत देणार नसल्याची मनगट उंचावून जाहीर शपथ धनगर बांधवांनी यावेळी शपथ घेतली आहे.

हे  चोर दरोडेखोर झाले असून आता यांना धडा शिकवा असा भाजपविरोधात एल्गार या मेळाव्यात देण्यात आला आहे. 11 आणि 129 तारखेला प्रत्येक धनगर पाच दिवस काळ्या गुढी उभारणार असून चवदार तळयापासून थेट मंत्रालयावर धडक टाकण्यात येणार आहे. बायका पोरांसह मेंढ्या घेऊन मुंबईवर चला आरक्षण झाल्याशिवाय मुंबईतून बाहेर पडायचं नाही, दहा दिवसाची तयारी करा असं आवाहनही गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

COMMENTS