कृषीपंपाचे वीज बिल सक्तीने वसूल करण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आदेश !

कृषीपंपाचे वीज बिल सक्तीने वसूल करण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आदेश !

मुंबई – राज्यातील कृषी पंपधारक वीज ग्राहकांकडून वीज बिलाची थकबाकी सक्तीने वसूल करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. 25 हजार रुपयांपेक्षा कमी वीज बिल थकीत असल्यास 3 हजार रुपये तातडीने वसूल करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत. तर 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकीत असल्यास 5 हजार रुपये तातडीने वसूल करा असे आदेशही बावनकुळे यांनी दिले आहेत.

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान ऊर्जा मंत्र्यांच्या आदेशानुसार कृषिपंपधारकांची थकीत वीज बिल वसुली सक्तीने करण्यासाठी महावितरणने राज्यभरातील सर्व अभियंत्यांना पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ असताना वीज बील वसुलीचे आदेश निघाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट आलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS