‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, असा आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला !

‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, असा आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. नवीन सदस्यांचा शपथविधी समारंभ राजभवनाच्या प्रांगणात पार पडला.या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 13 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून शपथविधीचा पहिला मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

दरम्यान, विखे पाटील यांना सार्वजनिक बांधकाम, आशिष शेलार यांना गृहनिर्माण, अनिल बोंडे यांना कृषी, डॉ. संजय कुटे यांना समाज कल्याण, सुरेश खडे यांना आदिवासी विकास, अशोक उईके यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 10+2+1 असा असून यामध्ये भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.

या विभागातील नेत्यांना संधी

मुंबईतून आशिष शेलार (भाजप), योगेश सागर (भाजप), अविनाश महातेकर (रिपाइं) यांनी शपथ घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातून सुरेश खाडे (भाजप), बाळा भेगडे (भाजप) यांनी शपथ घेतली.

मराठवाड्यातून अतुल सावे (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) यांनी शपथ घेतली.

उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) यांनी शपथ घेतली.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातून तानाजी सावंत (शिवसेना) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

विदर्भ
अनिल बोंडे (भाजप), परिणय फुके (भाजप), संजय कुटे (भाजप), अशोक उईके (भाजप)
यांनी शपथ घेतली.

COMMENTS