मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’, महाराष्ट्रात काय चाललंय?, फडणवीस म्हणाले अधिवेशन चाललंय!

मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’, महाराष्ट्रात काय चाललंय?, फडणवीस म्हणाले अधिवेशन चाललंय!

मुंबई – मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’ सुरु आहे. त्यामुळे अपक्षांच्या पाठिंब्याने चालणारं काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे. आता ज्योतिरादित्य यांनी भाजपची वाट धरल्यामुळे ‘कमलनाथ जाणार आणि ‘कमळ’ उमलणार’ असं चित्र आहे. असं असले तरी काँग्रेसनं मात्र आपलंच सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ‘बघुया काय होतंय’ असं मोघम उत्तर त्यांनी दिलं आहे. मात्र ‘महाराष्ट्रात काय चाललंय असं विचारलं असता ‘महाराष्ट्रात अधिवेशन चाललं असल्याचं मिश्किल उत्तर फडणवीसांनी दिलं आहे.

दरम्यान मध्य प्रदेशमध्ये सुरु असलेल्या या राजकीय नाट्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू शकतात अशी चर्चा आहे. कारण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारलाही नजीकच्या काळात हादरे बसण्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते मात्र सरकारला कोणतीही भीती नसल्याचं म्हणत आहेत. परंतु फडणवीस यांनी मात्र यावर बोलण टाळलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS