केवळ आश्वासनं देतायेत, यापूर्वीच्या आश्वासनांचं काय झालं ?  दुष्काळी पहाणी दौ-यावर आलेल्या मंत्र्यांना शेतक-यांनी विचारला जाब ! व्हिडिओ

केवळ आश्वासनं देतायेत, यापूर्वीच्या आश्वासनांचं काय झालं ?  दुष्काळी पहाणी दौ-यावर आलेल्या मंत्र्यांना शेतक-यांनी विचारला जाब ! व्हिडिओ

उस्मानाबाद – राज्यात दुष्काळाचं संकट आलं आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई, चारा टंचाई यामुळे नागरिक हैराण आहेत. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. दुष्काळाची माहिती घेण्यासाठी मंत्री राज्यभरात दौरा करत आहेत. उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जिल्ह्याच्या ग्रामिण भागात दुष्काळाची पाहणी केली. यावेळी शेतक-यांसोबत त्यांनी संवाद साधला. मात्र शेतक-यांच्या रोषाचा सामना खोतकारांना करावा लागला. सरकारनं दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल संतापलेल्या शेतक-यांनी केला. पहा काय म्हणाले शेतकरी….

COMMENTS