महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार ?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार ?


मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी देण्याच्या विचारात असल्याची माहिती असून याबाबत सरकारकडून थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे. देशभरात नुकतेच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपतर्फे मुंबईत दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. त्याशिवाय गेल्या पाच वर्षांच्या विकासकामांची ब्लू प्रिंट जनतेसमोर मांडणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान मार्च 2016-17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन त्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. तसेचविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात विकास यात्रा काढून जनतेशी संवादही साधणार आहेत.

COMMENTS