नाशिक – संतापलेल्या शेतक-यांनी आमदार, सभापतींना कोंडले मंदिरात !

नाशिक – संतापलेल्या शेतक-यांनी आमदार, सभापतींना कोंडले मंदिरात !

नाशिक – दिंडोरी-लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असल्याचं पहावयास मिळालं आहे. देवसाने येथे शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी, आमदार, सभापती यांना घेराव घालत आता चर्चा नको आश्वासने पूर्ण करत, न्याय द्या म्हणत सर्वांना तब्बल चार तास मंदिरात कोंडून ठेवले होते. दरम्यान चारणवाडीसह सर्व बंधाऱ्यांचे काम सुरू करण्याचे आश्वासनानंतर सर्वांची सुटका करण्यात आली असून अगोदर साठवण बंधारे यांची कामे होईपर्यंत बोगद्याचे काम बंदच ठेवण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम आहेत.

दरम्यान मांजरपाडा प्रकल्प करताना स्थानिक आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवत त्यासाठी परिसरात विविध लघु बंधारे बांधण्याचे ठरले होते. नुकतेच रखडलेल्या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू झाले मात्र त्यामुळे परिसरातील विहीर बोअरवेलचे पाणी गेल्याने शेतकऱ्यांनी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी प्रकल्पास भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली व सात दिवसात पूर्वी ठरल्याप्रमाणे बंधाऱ्यांची कामे सुरू करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र लघुपाटबंधारे विभागाने बोगद्याच्या कामामुळे विहिरी बोअरवेलचे पाणी कमी झाल्याचा नकार देत राखीव पाणीसाठ्याची कामे मांजरपाडा 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आदिवासी, प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. यादरम्यान देवसाने येथे लघुपटबंधारे विभागाचे अभियंता संघांनी हे आले असता आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, सभापती एकनाथ गायकवाड अभियंता संघांनी यांच्या उपस्थितीत मारुती मंदिरात बैठक घेण्यात आली. त्यानंतर आमदार झिरवाळ यांच्यासह शेतकऱ्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे आहे ह्याच मांजरपाडा प्रकल्पांतर्गत चारणवाडीसह विविध बंधाऱ्यांची कामे सुरू करण्याची मागणी केली. मात्र अधिकारी हे फक्त शासन निर्णय वाचून दाखवत होते. त्यानंतर शेतक-यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार, सभापतींसह अधिकाऱ्यांना मंदिरात कोंडत प्रकल्पाचे काम बंद पाडले. सर्व कामे सध्याच्या मांजरपाडा प्रकल्पात वर्ग करत त्वरित सुरू करावे या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या घटनेचे वृत्त समजताच प्रशासन खडबडून जागे झाले पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली तर तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली.

त्यानंतर आमदार नरहरी झिरवाळ यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडत सर्व बंधाऱ्यांची कामे अगोदर करावी नंतर बोगद्याचे काम करावे अशी मागणी केली. अखेर कार्यकारी अभियंता संघांनी यांनी सर्व समाविष्ट बंधाऱ्यांची कामे सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

COMMENTS