लोकसभा निवडणूक पहिला टप्पा: सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १३.७५ टक्के मतदान !

लोकसभा निवडणूक पहिला टप्पा: सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १३.७५ टक्के मतदान !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळी ७ ते ११ या कालावधीत सरासरी १३.७५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा १५.७६%, रामटेक (अ.जा.) ९.८२%, नागपूर १७.५६%, भंडारा-गोंदिया १२.२%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) १८.०१%, चंद्रपूर १०.८६% आणि यवतमाळ-वाशिम 12.06% असे मतदान झाले.

COMMENTS