पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू – शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई – करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी लॉकडाउन जाहीरर करण्यात आले. तेव्हापासून देशातील शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आली. मिशन बिगिनंतर्गत टप्प्याटप्याने शाळा सुरू केल्या जात आहेत. आता हळूहळू शाळा उघडण्यास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. आता राज्य सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली केली.

सध्या राज्यात सर्वत्र आॅनलाईन शिक्षण सुरू आहे. आठवी पर्यंतसर्व शाळा आॅनलाईन पध्दतीने सुरु असून “मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते” असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, संस्था चालकांनी शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधित उपाय योजना केल्या आहेत.

COMMENTS