गिरीश महाजन म्हणाले, …त्यामुळेच रोहिणी खडसेंचा पराभव झाला!

गिरीश महाजन म्हणाले, …त्यामुळेच रोहिणी खडसेंचा पराभव झाला!

जळगाव – भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या पराभवावर वक्तव्य केलं आहे.तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाला असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत. प्रत्येक निवडणुकीत मुक्ताईनगरची लढत ही चुरशीची असते. मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने खडसे पराभूत झाले. सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले, परंतु मुक्ताईनगरची लढत चुरशीची असल्याने पराभव झाला असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. भाजपने ओबीसी नेत्यांना डावललं, एकतर त्यांना तिकीट दिलं नाही आणि ज्यांना तिकीट दिलं त्यांना भाजपमधील गटाने पाडलं असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. त्यावर महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व पक्षांपेक्षा जास्त ओबीसी आमदार भाजपमध्ये आहेत, भाजप हा ओबीसींना प्राधान्य देणारा पक्ष आहे, तसंच भाजपमधील एकही आमदार फुटणार नाही, असा दावा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

COMMENTS