पाच वर्षे नाही तर पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल – शरद पवार

पाच वर्षे नाही तर पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल – शरद पवार

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास सरकारने उत्तम काम केले आहे.  हे सरकार पाच वर्षे चालेल एवढा कद्रूपणा का करायचा? पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल, असा विश्वास शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात व्यक्त केला. ‘महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही’ या पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे सगळे मंत्री उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, भाजपाची हातातली सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले. त्यानंतर चर्चा सुरु झाली की हे सरकार पडणार. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारने उत्तम काम केलं आहे. करोनाच्या काळातही त्यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला. खरंतर मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्यांना हे सगळं कसं जमेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र त्यांना प्रशासकीय अनुभव नसला तरीही त्यांच्या चातुर्यात काहीही कमतरता नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS