खासदार इम्तियाज जलील यांचा  उद्धव ठाकरेंना खोचक टोला !

खासदार इम्तियाज जलील यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला !

औरंगाबाद – एमआयएमचे निवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.’उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करून घ्यायला हवी. एमआयएमचा विजय झाल्याने आता राज्यभर चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही शिवसेनेचा पराभव करून वंचित बहुजन आघाडी औरंगाबादमधील सातही जागा जिंकेल,’ असं म्हणत इम्तियाच जलील यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. त्यानंतर खैरेंचा पराभव हा माझा पराभव असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.
खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी खैरेंना दिला होता. ‘औरंगाबाद उघड्यावर सोडणार नाही. पुन्हा औरंगाबादवर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं.

त्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.’उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करून घ्यायला हवी. एमआयएमचा विजय झाल्याने आता राज्यभर चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही शिवसेनेचा पराभव करून वंचित बहुजन आघाडी औरंगाबादमधील सातही जागा जिंकेल असा दावा जलील यांनी केला आहे.

COMMENTS