राष्ट्रवादीच्या अत्याचारी पदाधिकाऱ्यास सरकार पाठीशी घालतंय

राष्ट्रवादीच्या अत्याचारी पदाधिकाऱ्यास सरकार पाठीशी घालतंय

मुंबई – गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. बऱ्याच गुन्ह्यामध्ये सरकार आरोपींना पाठीशी घातल आहे. औरंगाबाद येथील अत्याचाराच्या घटनेमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी संशयित आरोपी आहेत. पोलिसांकडून अद्याप आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे पिडितांना मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने आरोपींना अटक करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.

वाघ म्हणाल्या, औरंगाबाद येथील एका महिलेने राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर फिर्याद दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून अजूनही संबंधित आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून पिडीत महिलेचे मनोबल खचत आहे. पोलिस अजून तपास सुरु असल्याचे सांगून आरोपीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी पिडीत महिलेची फिर्याद सोशल मिडियावर व्हायरल केली. अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच संबंधित आरोपीला अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली

COMMENTS