मुख्यमंत्री बदलले तर पाठिंबा काढू, अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा !

मुख्यमंत्री बदलले तर पाठिंबा काढू, अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपक्ष आमदारांनी पाठिंबा दर्शवला असून मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचंही यावेळी रवी राणा यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारला एकूण सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा असून याचं नेतृत्व रवी राणा हे करत आहे. त्यामुळे रवी राणा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अपक्ष आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंशी अशल्याचं दिसत आहे.

दरम्यानन भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल केला होता. त्यानंतर भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बदलण्याची आवश्यकता नसून फडणवीस हे सक्षम नेते असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री बदलल्यास आम्ही सरकारसोबत राहणार नाही, असा इशाराच दिला आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी आहोत. ते मराठा समाजाला आरक्षण देण्यास सक्षम आहेत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांच्यामुळेच शिवसेना सत्तेत असल्याचंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS